समायोजन बदल्या

 समायोजन बदल्या 


शासन निर्णय दि. १८ मे २०११ नुसार ......

              दर वर्षी दिनांक 30 सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्या आधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाचा ने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरवर्षी खालील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करावे.
                     
 1 दि. 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे.
 2 असे समायोजन करीत असताना तालुक्यातच जर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळा असतील तर प्रथमता तालुक्यातील अशा शाळांमधून समायोजन करण्यात यावे.( जर ते अन्यथा तालुक्याबाहेर बदलीस पात्र नसतील तरच)
 3 एखाद्या शाळेत पटसंख्या निश्चिती नंतर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक झाली असतील तर ते शिक्षक त्या शाळेत जास्त काळ (ज्येष्ठत्तम) कार्यरत असतील अशा शिक्षकांचे समायोजन करावे. असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना मुख्याध्यापकांच्या व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी. असे करत असताना शक्यतो खालील शिक्षकांचे समायोजनसाठी निवड करण्यात येऊ नये.
तो जिल्हा स्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्यापैकी संघटनांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष 
शिक्षकांच्या समायोजन दिनांकापासून (३० सप्टेंबर) पासून सेवानिवृत्ती पाच वर्षे कालावधी शिल्लक राहिला असल्यास.
( तरीसुद्धा समायोजना द्वारे शाळेत अतिरिक्त ठरत असल्यास त्यांच्या विनंती प्रमाणे त्यास तालुक्यात इतर शाळेत प्राधान्याने समायोजन करण्यात यावे) 
4 समायोजन करत असताना विधवा ,परितक्त्या ,कुमारिका ,अपंग शिक्षक तसेच एकत्र कार्यरत पतीपत्नी अतिरिक्त ठरत असल्या त्यांचे समायोजन तालुका अंतर्गत प्राधान्याने करावे.
5  एखाद्या तालुक्यात मंजूर पदांपैकी  जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास वरील मुद्दा क्रमांक तीन प्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तालुक्यातील जास्तीत जास्त सेवा झालेल्या शिक्षकांमधून उतरत्या क्रमाने वास्तव्य जेष्ठता यादी तयार करून जे शिक्षक या तालुक्यात सलग जास्त काळ कार्यरत असतील त्यांचे समायोजन जिल्हा स्तरावरून करण्यात यावे. मात्र असे समायोजना द्वारे बदली करताना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात बदली मागितल्यास प्राधान्य द्यावे. 
6 तालुका अंतर्गत किंवा जिल्हास्तरावरून अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने कराव्यात. समुपदेशन करताना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खालील प्राधान्यक्रमाने पदस्थापना देण्यात यावी.
  विधवा
  परितक्त्या / कुमारिका / घटस्फोटीत महिला (२७ एप्रिल २०१२ च्या gr नुसार घटस्फोटीत महिला येथे add केल्या आहेत.)
  अपंग कर्मचारी (अस्थिव्यंग ,अल्पदृष्टी व इतर )
 ड स्वतः गंभीर आजाराने त्रस्त कर्मचारी ( जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र प्रति स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आवश्यक)
  सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी
  पती-पत्नी एकत्रीकरण 
 फ तालुका वास्तव्य ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले 
                समायोजनाची कार्यवाही करत असताना सर्व रिक्त पदे जाहीररित्या दाखवणे अनिवार्य राहील. 
 7 तालुक्यामध्ये समायोजन करत असताना कोणत्याही द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षक शाळेत पद रिक्त राहणार नाही अशा रीतीने समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी. (उदाहरणार्थ जर तालुक्यांमध्ये 15 रिक्त पदे आहेत आणि फक्त दहा शिक्षकांचे समायोजन करावयाची आहे तर सर्व पंधरा रिक्त पदे दाखवण्यात यावी. परंतु पंधरा मध्ये जर 3 द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्यक्रमानुसार सात शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर तीन शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळेत पद रिक्त राहिल्यास प्राधान्यक्रमाने पदस्थापना द्यावी.)
 8 शिक्षकांचे समायोजन पूर्वी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरून 31 जुलैपर्यंत पदोन्नतीची कार्यवाही करणे बंधनकारक राहील. पदोन्नती दिल्यानंतर  संबंधितांना 31 ऑगस्टपर्यंत रुजू होणे आवश्यक राहील. पदोन्नती साठी किमान 50 टक्के प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी जेणेकरून रुजू  न होणाऱ्या व पदोन्नती नाकारणार्‍या शिक्षकांच्या जागी पदस्थापना देणे सोईस्कर होईल. पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत समुपदेशन पद्धतीचा अवलंब करावा व त्यासाठी प्राधान्यक्रम वरील अनुक्रम क्रमांक सहा मध्ये दर्शविल्याप्रमाणे अ ते ई पर्यंत तसेच फ सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ  राहील. जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक पदोन्नतीच्या पदावर रुजू होतील. नियमित पदोन्नत्या त्याच्या नंतर सुद्धा करता येतील.
  समायोजन करताना दर वर्षी 30 सप्टेंबर ही तारीख विचारात घेऊन प्रचलित नियमानुसार पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चित करावी. त्या अनुषंगाने 20 ऑक्‍टोबरपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मान्यतेची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदतीत प्रस्ताव सादर करूनही जर विभागीय उपसंचालक यांनी प्रस्तावाला २५ ऑक्टोंबर पर्यंत कोणताही निर्णय कळवला नाही तर त्यांची मान्यता गृहीत धरून कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबर पर्यंत पटसंख्या व शिक्षक संख्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित करावी. तसेच जिल्ह्यातील समायोजनाची कामे 31 ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण करावे .
10 समायोजना द्वारे अतिरिक्त ठरवून इतरत्र झालेल्या बदलांच्या अनुषंगाने काही कर्मचार्‍यांच्या तक्रारी असल्यास दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत विभागीय आयुक्त यांचेकडे करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करून दिनांक  25 नोव्हेंबर पर्यंत निर्णय घ्यावा व दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत संबंधित जिल्ह्याने त्याची अंमलबजावणी करावी. विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील. विभागीय आयुक्त यांना अशा तक्रारीची दखल घेता यावी म्हणून त्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. 
11 काही शिक्षक परस्पर समायोजना बाबत शासनाकडे तक्रारी करतात असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील अशा तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
12 समायोजन साठी विहित कालावधी ठरवून दिलेला असल्याने ज्या जिल्ह्यात सदरची कार्यवाही विहित कालावधीत होणार नाही. त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना जबाबदार धरण्यात येईल. जिल्हा परिषद शिक्षकांच्या समायोजनाचा अंतर्गत बदल्या बाबत तक्रारी प्राप्त होतात. त्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन न करता समायोजन केल्याच्या बहुतांश तक्रारीचा अंतर्भाव असतो. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी व न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. हे सर्व टाळण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
  शिक्षकांच्या समायोजनाचा मध्ये पारदर्शकता राहावी यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे पालन करून समुपदेशनाद्वारे समायोजन अंतर्गत बदल्या करण्याची दक्षता सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी.
 ब कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांविरुद्ध नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी.
समायोजन करताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
       वरील प्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे माहितीस्तव वेळोवेळी पाठविण्यात यावा. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०११-२०१२  पासून पुढे होणाऱ्या समायोजनांसाठी लागू राहील.

अपंगांचे (दिव्यांगांचे) समायोजन
 
 शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2012 नुसार......

              जे कर्मचारी अपंग आहेत व ज्यांनी प्राधिकृत प्राधिकार याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यांना समायोजन प्रक्रियेतून वगळण्यात यावे. तसेच जे कर्मचारी मतिमंद मुलांचे / व्यक्तींचे पालक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही समायोजन प्रक्रियेतून पूर्णता वगळण्यात यावे.या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भातील दिनांक 18 मे 2011 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 4 मधील अपंग शिक्षक अनु क्रमांक सहा मधील  अपंग कर्मचारी ,अस्थिव्यंग, अल्पदृष्टी व इतर हा उल्लेख वगळण्यात यावा.
शासन निर्णय दि २७ एप्रिल २०१२ नुसार......

शासननिर्णय दि. १८ मे २०११ च्या अ क्र ६ ब मध्ये परित्यक्त्या / कुमारिका या ऐवजी परित्यक्त्या / कुमारिका /घटस्फोटीत महिला असे वाचावे.


वरील सर्व शासन निर्णय खाली आपण एकत्रित  पाहू शकता व download  करू शकता.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. माझ्या शाळेचा पट 30 सप्टेंबरला 6 आहे. शाळेत मंजुर पदे 2 आहेत. कार्यरत 2 आहेत. मला सध्या दुसऱ्या शाळेत तात्पुरती नियुक्ती दिली आहे. तर माझे समायोजन बदली होईल का किंवा याबाबत मार्गदर्शन मिळावे.

    उत्तर द्याहटवा
  2. माझा what's up number 9421642931 आहे

    उत्तर द्याहटवा
  3. समायोजन बदल्या करण्यासाठी शासनाने मागिल दोन वर्षांपासून शिक्षक संचमान्यता तरी केली आहे का ? कोरोनाच्या नावाखाली संचमान्यता जाणिवपुर्वक टाळण्यात आल्या.वास्तविक संचमान्यता ऑनलाईन पध्दतीने करता येवू शकली असती.

    उत्तर द्याहटवा
  4. समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, मी दिनांक २९/१०/२००५ ला यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग शाळेमध्ये नियूक्ती झाली , परंतु दिनांक १/४/२०१७. ला पटसंख्या कमी झाली यामुळे अतिरिक्त झालो होतो माझे समावेजन अडिच वर्षा नंतर झाले आयुक्तांच्या दिराईगां मुळे त्या वर्षांचा पगार मिळत नाही
    सेवा खंड समर्पित करण्यात वेळ लावतात
    संस्थापक समाज कल्याण विभाग मध्ये प्रस्ताव सादर करीत नाही , त्यामुळे काल्पनिक वेतन वाढ झाली नाही
    माझी विनंती आहे की आयुक्त साहेबांनी समावेशीत शिक्षकांचा प्रश्न सोडवा, काल्पनिक वेतन वाढ चा आदेश काढावा

    उत्तर द्याहटवा
  5. दर्जा वाढ किंवा पदोन्नती साठी अ ते फ क्रम विचारात घेऊन बदल्या केल्या जातात का

    उत्तर द्याहटवा
  6. अपंग शिक्षक समायोजनाबाबत आपण जो शासन निर्णय टाकला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर व सदरील शासन निर्णयाचा सांकेतांक शासनाच्या वेबसाईटवर टाकला असता कुठेही पहावयास मिळत नाही त्यामुळे अपंग शिक्षकाच्या समायोजनाबाबत त्यांना प्रक्रियेतून सूट द्यावी या शासन निर्णयाबाबत संभ्रम आहे सदरील शासन निर्णय हा फेक आहे असे दिसून येत आह

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .